Friday, October 24, 2025
Friday, October 24, 2025
Friday, October 24, 2025
spot_img
spot_img
A venture of Pen First Media and Entertainment Pvt. Ltd
Member of Working Journalist Media Council Registered by - Ministry of Information and and Broadcasting, Govt. Of India. New Delhi
HomeMarathiमुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान – प्रशासनाकडे पंचनाम्याची मागणी.

मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान – प्रशासनाकडे पंचनाम्याची मागणी.

अमळनेर, ता. ३० ऑगस्ट – काल अमळनेर तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक गावांमध्ये शेतपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. काही भागांत ढगफुटीसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. नाले आणि गटारे तुडुंब भरल्यामुळे रस्त्यांवर पाणी साचले असून काही घरांमध्येही पाणी शिरले आहे.

तालुक्यातील वासरे, कलाली, टाकरखेडा, हिंगणे, मांडळ, जवखेडा या गावांमध्ये पावसाने थैमान घातले. विशेषतः टाकरखेडा शिवारात मका, कपाशी तसेच डाळ वर्गातील पिकांचे हजारो हेक्टरवर अतोनात नुकसान झाले आहे.

या संकटामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी जोरदार मागणी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

You cannot copy content of this page

error: Content is protected !!