Saturday, March 14, 2026
Saturday, March 14, 2026
Saturday, March 14, 2026
spot_img
spot_img
A venture of Pen First Media and Entertainment Pvt. Ltd
Member of Working Journalist Media Council Registered by - Ministry of Information and and Broadcasting, Govt. Of India. New Delhi
HomeMarathiअमळनेरचा भक्तिरसात न्हालेला संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा.

अमळनेरचा भक्तिरसात न्हालेला संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा.

अभंग, कीर्तन, नृत्य आणि टाळ-मृदंगाच्या निनादात नगरभरून उमटला संतपरंपरेचा गजर.

अमळनेर :- संतश्रेष्ठ श्री. ज्ञानेश्वर महाराज यांच्या सप्तशतकोत्तर सुवर्षमहोत्सवी (७५० वे) जयंती वर्षानिमित्त, महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाच्या आदेशानुसार अमळनेर नगरपालिकेत आजचा दिवस भक्तिभाव, आध्यात्मिकता आणि सांस्कृतिक ऐक्याचा अविस्मरणीय सोहळा ठरला.

वारकरी परंपरेच्या सुवासाने आणि भक्तिरसाच्या अमृतधारेने ओथंबलेल्या या पालखी सोहळ्यास संध्याकाळी पाच वाजता प्रारंभ होऊन सात वाजेपर्यंत नगरपरिषद कार्यालयातून मंगलमय आरतीने सुरुवात झाली. टाळ-मृदंगाच्या गजरात, हरिनामाच्या घोषात आणि संतांच्या अभंग-कीर्तनाच्या स्वरमाधुरीत पालखी नगरातील प्रमुख चौकातून मार्गक्रमण करत राहिली.

सुभाष चौक, राणी लक्ष्मीबाई चौक, दगडी दरवाजा, तिरंगा चौक, पाच पावली चौक, कोंबडी बाजार — या प्रत्येक ठिकाणी वारकरी नृत्य, अभंग गायन आणि जनतेच्या ओसंडून वाहणाऱ्या श्रद्धेने सोहळ्याला अद्वितीय तेज प्राप्त झाले.
भक्तिभावाने उजळलेले चेहरे, उत्साहाने भरलेले मन. पालखी सोहळ्यात मुख्याधिकारी तुषार नेरकर, उपमुख्याधिकारी श्री. रवींद्र चव्हाण, लेखापाल सुदर्शन शामनाणी, कर निरीक्षक लौकिक समशेर, आस्थापना प्रमुख श्री. विनोद पाटील, आरोग्य निरीक्षक श्री. किरण कंडेरे, श्री. संतोष माणिक, NULM विभाग प्रमुख चंद्रकांत मुसळे, अतिक्रमण विभाग प्रमुख राधेश्याम अग्रवाल, तसेच महिला कर्मचारी — श्रीमती राधा नेतले, श्रीमती पूजा उपासनी, श्रीमती उज्वला पाटील यांच्यासह नगरपरिषद अधिकारी-कर्मचाऱ्यांनी मनःपूर्वक सहभाग घेतला.

अभंग, कीर्तन आणि मृदंग निनादाचा सोहळा.

वारकरी भजनी मंडळ पैलाडच्या नेतृत्वाखाली बाळू महाराज मराठे, बागले मामा, विजय महाराज, शत्रुघ्न महाराज, रमेश महाराज, प्रताप महाराज, वसंत महाराज, बंटी महाराज, ज्ञानेश्वर महाराज तसेच बाल भजनी मंडळाने अखंड हरिनामाच्या गजराने व अभंग-कीर्तनाने संपूर्ण नगर भक्तिरसात न्हावले.

सन्मानाचा क्षण आणि दैवी समारोप.

सोहळ्याच्या समारोपावेळी मुख्याधिकारी यांच्या हस्ते सर्व सहभागी वारकऱ्यांना शाल, श्रीफळ आणि सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
यानंतर संत ज्ञानेश्वर महाराजांची दैवी आरती झाली आणि “पसायदान” या अमृतमंत्राने आकाश भारावून गेले.
या क्षणी जणू संपूर्ण अमळनेर भक्तिरंगाने नटले, आणि प्रत्येक मन हरिनामाच्या आनंदधुंद लहरीत विसावले. हा पालखी सोहळा केवळ धार्मिक नव्हे तर सांस्कृतिक एकतेचा आणि वारकरी परंपरेच्या अखंडतेचा अविस्मरणीय उत्सव ठरला.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

You cannot copy content of this page

error: Content is protected !!