Wednesday, September 3, 2025
Wednesday, September 3, 2025
Wednesday, September 3, 2025
spot_img
spot_img
A venture of Pen First Media and Entertainment Pvt. Ltd
Member of Working Journalist Media Council Registered by - Ministry of Information and and Broadcasting, Govt. Of India. New Delhi
HomeMarathiमुख्याधिकारी गायब! अमळनेर नगरपालिकेचा कारभार वाऱ्यावर!

मुख्याधिकारी गायब! अमळनेर नगरपालिकेचा कारभार वाऱ्यावर!

रिपोर्टर नूरखान

मुख्याधिकारी कार्यालयात अनुपस्थित; कर्मचाऱ्यांचे तीन महिन्यांचे पगार रखडले; सौर प्रकल्प मात्र सुरू!

प्रतिनिधी | अमळनेर
अमळनेर नगरपालिकेचा कारभार सध्या अक्षरशः वाऱ्यावर चालला आहे. मुख्याधिकारी केव्हा कार्यालयात येतात आणि केव्हा निघून जातात याची कुणालाही खबर नसते. गेल्या अनेक आठवड्यांपासून कार्यालयात प्रशासनाचा शिस्तभंग आणि गैरहजेरीचे गंभीर चित्र नागरिकांपुढे आले आहे.

मुख्याधिकारी नियमित उपस्थित नाहीत, कर्मचारीही त्यांच्या गैरहजेरीच्या आड कामकाज टाळत आहेत. परिणामी, शहरातील महत्त्वाची कामे रखडली आहेत. सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या प्रलंबित आहेत.

कर्मचाऱ्यांचे तीन महिने पगार न मिळाल्याने संताप!

विशेष म्हणजे, नगरपालिका कर्मचाऱ्यांचे तीन महिन्यांचे पगार थकलेले आहेत. अनेक कर्मचाऱ्यांना घर चालवणं अवघड झालं आहे. दुसरीकडे, लाखो रुपयांचा सौर प्रकल्प मात्र धडाक्यात सुरू आहे.

हे पाहून नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे — पगाराला पैसे नाहीत पण सोलर लावायला आहेत? हे प्राधान्य कशाचं?

कार्यालयात फक्त हजेरी? काम कोणी करतंय?

नगरपालिकेतील काही अधिकारी केवळ हजेरी लावण्यापुरते कार्यालयात येतात. काम करण्याऐवजी वेळ काढून जातात. कार्यालयात शिस्त, नियोजन, कामाचे वितरण — या सर्व गोष्टींकडे कोणीच लक्ष देत नसल्याने प्रशासन कोलमडत आहे.

“कंटाळा आला असेल तर राजीनामा द्या!” — जनतेचा सवाल

शहरातील नागरिक आता थेट सवाल करत आहेत — “जर मुख्याधिकारी यांना या पदाचा कंटाळा आला असेल, तर त्यांनी पद सोडून द्यावे!”

कारण हे पद केवळ सत्तेचं नसून, जनतेच्या सेवेसाठी असतं. इतकी बेजबाबदारी, हलगर्जीपणा, आणि लोकांच्या पैशाचा अपमान सहन केला जाणार नाही, अशी भावना लोकांमध्ये वाढीस लागली आहे.

प्रशासनाचे मौन संशयास्पद!

या सर्व प्रकरणावर अद्याप कोणत्याही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी किंवा पालिका प्रशासनाने खुलासा केलेला नाही. नागरी समस्या दिवसेंदिवस गंभीर होत असताना, प्रशासनाचे हे मौन संशयास्पद ठरत आहे.

जिल्हाधिकारी यांच्याकडे याबाबत तक्रार दिली गेली, तर या गैरव्यवस्थेची चौकशी होण्याची शक्यता आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular